प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी आदर्श : साईभक्ताच्या सतर्कतेमुळे ₹१५,४१० ची पर्स मालकाला सुखरूप परत
श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाने आजवर ₹८५ लाखांहून अधिक किमतीच्या हरवलेल्या वस्तू परत करून जपला भक्तांच्या विश्वासाचा ठेवा
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. श्रद्धा आणि भक्तीभावाने ते साईचरणी आपली सेवा अर्पण करतात. या भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुखद दर्शन मिळावे, तसेच त्यांच्या मालमत्तेचीही संपूर्ण सुरक्षितता राखली जावी, यासाठी श्री साईबाबा संस्थानचा संरक्षण विभाग अहोरात्र कार्यरत आहे. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या त्यांच्या मूळ मालकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याच्या कार्यातून संरक्षण विभागाने सेवाभाव, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
आजपर्यंत संरक्षण विभागाने सुमारे ₹८५ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कम, दागिने, महिलांच्या पर्स, मोबाईल, घड्याळे तसेच इतर मौल्यवान वस्तू संबंधित साईभक्तांना सुरक्षितपणे परत केल्या आहेत. संरक्षण विभागाच्या या उल्लेखनीय कार्याची विविध प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दखल घेत त्यांचे कौतुकही केले आहे.
सध्या शिर्डीत गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून उद्यापासून महोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या वातावरणातही आज प्रामाणिकपणाचा एक प्रेरणादायी प्रसंग घडला.
आज श्री साईबाबा मंदिरातील पारायण कक्षात पारायण करत असताना सौ. अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना एक पर्स आढळून आली. सदर पर्समध्ये ₹१५,४१०/- रोख रक्कम तसेच आधार कार्ड होते. कोणताही मोह न बाळगता त्यांनी ती पर्स तत्काळ श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
संरक्षण विभागाने पर्समधील आधार कार्डच्या आधारे चौकशी करून ती श्री जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर मंदिर परिसरात उद्घोषणा करून संबंधित साईभक्तांना संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. काही वेळातच श्री. राजू संरक्षण कार्यालयात आले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांना त्यांची पर्स आणि त्यातील ₹१५,४१०/- रोख रक्कम सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली.
एका साईभक्ताने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे दुसऱ्या साईभक्ताला त्याची हरवलेली रक्कम परत मिळाली. श्रद्धा, सचोटी आणि मानवतेचा हा सुंदर संगम साईबाबांच्या शिकवणीचा जिवंत अनुभव देणारा ठरला.
सौ. अनुपमा निरंजन यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व तत्परतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून विशेष अभिनंदन केले.
संरक्षण विभाग प्रमुख श्री. रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास आणि संस्थानच्या विविध ठिकाणी सापडलेल्या हरवलेल्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा प्रत्येक कर्मचारी साईभक्तांना सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी समर्पित भावनेने सेवा बजावत आहे.
"साईसेवा व मानवसेवा" या ब्रीदवाक्याला साजेशी ही घटना केवळ हरवलेली पर्स परत मिळाल्याची नसून, श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचे जतन करणाऱ्या श्री साईबाबा संस्थानच्या सेवाभावी कार्याचा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरली आहे.
प्रामाणिकता का प्रेरणादायक आदर्श : साई भक्त की सतर्कता के कारण ₹१५,४१० का पर्स मालिक को सुरक्षित वापस मिला
श्री साईबाबा संस्थान के सुरक्षा विभाग ने अब तक ₹८५ लाख से अधिक मूल्य की खोई हुई वस्तुएं वापस करके भक्तों के विश्वास की थाती को सहेजा है।
श्री साईबाबा के दर्शन के लिए देश-विदेश से लाखों श्रद्धालु शिर्डी आते हैं। श्रद्धा और भक्ति भाव से वे साई चरणों में अपनी सेवा अर्पित करते हैं। इन भक्तों को सुरक्षित, सुगम और सुखद दर्शन मिले तथा उनकी संपत्ति की भी पूरी सुरक्षा बनी रहे, इसके लिए श्री साईबाबा संस्थान का सुरक्षा विभाग दिन-रात कार्यरत है। खोई हुई वस्तुओं को खोजकर उन्हें उनके असली मालिकों तक ईमानदारी से पहुँचाने के इस कार्य से सुरक्षा विभाग ने सेवा भाव, पारदर्शिता और ईमानदारी का एक अनुकरणीय आदर्श प्रस्तुत किया है।
अब तक सुरक्षा विभाग ने लगभग ₹८५ लाख से अधिक मूल्य की नकदी, आभूषण, महिलाओं के पर्स, मोबाइल, घड़ियाँ और अन्य कीमती वस्तुएं संबंधित साई भक्तों को सुरक्षित रूप से वापस की हैं। सुरक्षा विभाग के इस उल्लेखनीय कार्य की विभिन्न मीडिया माध्यमों ने समय-समय पर दखल लेते हुए प्रशंसा भी की है।
वर्तमान में शिर्डी में गुरुपूर्णिमा महोत्सव की जोरदार तैयारी चल रही है और कल से महोत्सव की शुरुआत हो रही है। इसलिए मंदिर परिसर में भक्तों की भारी भीड़ जुट रही है। ऐसे भीड़भाड़ वाले माहौल में भी आज प्रामाणिकता का एक प्रेरणादायक प्रसंग देखने को मिला।
आज श्री साईबाबा मंदिर के पारायण कक्ष में पारायण करते समय सौ. अनुपमा निरंजन (निवासी: बेंगलुरु) को एक पर्स मिला। इस पर्स में ₹१५,४१०/- नकद राशि के साथ-साथ पहचान पत्र (ID) भी था। बिना किसी लालच के उन्होंने तुरंत वह पर्स श्री साईबाबा संस्थान के सुरक्षा कार्यालय में जमा कर दिया।
सुरक्षा विभाग ने पर्स में मिले पहचान पत्र के आधार पर पूछताछ कर यह पता लगाया कि वह श्री जी. वी. राजू (निवासी: विशाखापत्तनम, आंध्र प्रदेश) का है। इसके बाद मंदिर परिसर में घोषणा करके संबंधित साई भक्त से सुरक्षा कार्यालय संपर्क करने का आह्वान किया गया। कुछ ही समय में श्री राजू सुरक्षा कार्यालय पहुँच गए। आवश्यक सत्यापन प्रक्रिया पूरी करने के बाद उन्हें उनका पर्स और उसमें मौजूद ₹१५,४१०/- नकद राशि सुरक्षित रूप से सौंप दी गई।
एक साई भक्त द्वारा दिखाई गई ईमानदारी के कारण दूसरे साई भक्त को उसकी खोई हुई रकम वापस मिल गई। श्रद्धा, सच्चाई और मानवता का यह सुंदर संगम साईबाबा की शिक्षाओं का जीवंत अनुभव कराने वाला साबित हुआ।
सौ. अनुपमा निरंजन द्वारा दिखाई गई ईमानदारी और तत्परता के लिए श्री साईबाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडिलकर ने उनका सत्कार कर विशेष अभिनंदन किया।
सुरक्षा विभाग प्रमुख श्री. रोहिदास माली के नेतृत्व में सुरक्षा विभाग के अधिकारी और कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास और संस्थान के विभिन्न स्थानों पर मिली खोई हुई वस्तुओं को उनके असली मालिकों तक पहुँचाने का कार्य लगातार कर रहे हैं। मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडिलकर के मार्गदर्शन में संस्थान का प्रत्येक कर्मचारी साई भक्तों को सुरक्षित, सुगम और आनंददायक दर्शन का अनुभव दिलाने के लिए समर्पित भाव से सेवा दे रहा है।
"साई सेवा और मानव सेवा" इस ध्येय वाक्य को सार्थक करने वाली यह घटना केवल एक खोई हुई पर्स वापस मिलने की नहीं है, बल्कि श्रद्धा, ईमानदारी और विश्वास को सहेजने वाले श्री साईबाबा संस्थान के सेवाभावी कार्य का एक और प्रेरणादायक अध्याय साबित हुई है।
An Inspiring Ideal of Honesty: A Purse Containing ₹15,410 Safely Returned to Its Owner Due to a Sai Devotee's Vigilance
Shri Saibaba Sansthan’s Security Department has preserved the treasure of devotees' trust by returning lost items worth over ₹85 Lakhs to date.
Millions of devotees from across India and abroad visit Shirdi to seek the blessings of Shri Saibaba. With utmost faith and devotion, they offer their service at His feet. To ensure these devotees experience safe, smooth, and pleasant visits, and to maintain complete security of their belongings, Shri Saibaba Sansthan's Security Department works round the clock. By tracing lost items and honestly returning them to their rightful owners, the security department has set an exemplary standard of service, transparency, and integrity.
To date, the security department has safely returned cash, jewelry, ladies' purses, mobile phones, watches, and other valuables worth more to ₹85 Lakhs to the respective Sai devotees. Various media outlets have frequently acknowledged and appreciated this remarkable work of the security department.
Currently, preparations are in full swing in Shirdi for the Gurupurnima Festival, which commences tomorrow. Consequently, a massive crowd of devotees has gathered in the temple premises. Amidst this bustling environment, an inspiring incident of honesty unfolded today.
While participating in the scripture recitation (Parayan) inside the Shri Saibaba Temple's Parayan Hall, Sau. Anupama Niranjan (Resident of Bengaluru) found a purse. The purse contained ₹15,410/- in cash as well as an identification card (Aadhaar Card). Without yielding to any temptation, she immediately deposited the purse at the Shri Saibaba Sansthan Security Office.
Using the identification card found inside the purse, the security department conducted an inquiry and established that it belonged to Shri G. V. Raju (Resident of Visakhapatnam, Andhra Pradesh). Subsequently, an announcement was made in the temple premises urging the concerned devotee to contact the security office. Within a short while, Shri Raju arrived at the security office. After completing the necessary verification process, his purse along with the cash of ₹15,410/- was safely handed back to him.
Because of the honesty displayed by one Sai devotee, another Sai devotee recovered his lost money. This beautiful amalgamation of faith, integrity, and humanity served as a living experience of Saibaba’s teachings.
In appreciation of the honesty and promptness shown by Sau. Anupama Niranjan, Chief Executive Officer of Shri Saibaba Sansthan, Hon. Shri Goraksh Gadilkar felicitated her and extended his special congratulations.
Under the leadership of Security Department Head Shri Rohidas Mali, the officers and staff of the security department continuously work to return lost items found across the temple premises, pilgrim accommodations (Bhakta Niwas), and various other Sansthan locations to their rightful owners. Under the guidance of Chief Executive Officer Hon. Shri Goraksh Gadilkar, every employee of the Sansthan is dedicated to providing Sai devotees with a safe, smooth, and joyous darshan experience.
Living up to the motto of "Sai Service is Humanity Service," this incident is not merely about a recovered purse, but stands as another inspiring chapter of the selfless and service-oriented work of Shri Saibaba Sansthan, which upholds faith, honesty, and trust.

